Best News Portal Development Company In India

श्रीकृष्ण विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फिरत्या तरांगणाच्या माध्यमातून जाणून घेतला चांद्रयान मोहिमेचा इतिहास – प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न ! उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

श्रीकृष्ण विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फिरत्या तरांगणाच्या माध्यमातून जाणून घेतला चांद्रयान मोहिमेचा इतिहास – प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
गुंजोटी येथील श्रीकृष्ण विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी चांद्रयान मोहिमेच्या इतिहासावर आधारित एक विशेष भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड जालना व पोलाद स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना भारताच्या अंतराळ क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची सखोल माहिती देण्यात आली.

श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी येथे आयोजित केलेल्या फिरत्या तारांगण शो च्या माध्यमातून अंदाजे पाच ते आठ मीटर व्यासाचे हवा भरलेले डीजी स्टार चे छोटेसे तारांगण उभे केले. या डोम मध्ये अत्याधुनिक फिश आयलेन्स वापरून उत्तम रिझोल्युशन प्रोजेक्टर मध्यभागी लावण्यात आला होता या डोम मध्ये एका वेळी ३५ ते ४० विद्यार्थी सहज सामावतील इतकी जागा आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून  Chandrayaan programme या मोहिमेचा परिचय करून दिला. त्यामाध्यामातून Indian Space Research Organisation (ISRO) या संस्थेची स्थापना, कार्य आणि अंतराळ संशोधनातील योगदान याबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यानी घेतली. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्सुकतेने या माहितीचे श्रवण केले.

यानंतर Chandrayaan-1 मोहिमेबद्दल माहिती दाखवताना चंद्रावर पाण्याचे अंश सापडल्याची ऐतिहासिक कामगिरी स्पष्ट करण्यात आली. पुढे Chandrayaan-2 मोहिमेतील आव्हाने आणि त्यातून घेतलेले धडे विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले. विशेषतः अपयशातून यशाकडे कसे वाटचाल करावी, याचा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरले Chandrayaan-3 मोहिमेचे यश. विक्रम लँडरचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी अवतरण आणि प्रज्ञान रोव्हरने केलेले संशोधन याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. या यशामुळे भारताने अंतराळ क्षेत्रात आपले स्थान अधिक बळकट केले असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे शिक्षकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपली जिज्ञासा व्यक्त केली.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मुंबई, हैदराबाद , बंगळुरू आदी ठिकाणच्या तारांगणासारखा अनुभव मिळाला

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास  श्रीकृष्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रविराज पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री सत्यवान भालेराव सर पर्यवेक्षक श्री.अविनाश पाटील सर सर्व शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india