तुळजापुरात महावितरणचा ‘कागदी’ कारभार; हलक्या वाऱ्यानेही वीजबिल फुल आणि बत्ती गुल, ग्राहकांचा संताप अनावर! तुळजापूर प्रतिनिधी: –
तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरासह संपूर्ण तालुक्यात महावितरणच्या ढिसाळ व निष्काळजी कारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले असून, “हलका वारा आला की वीज गायब” होत असल्याने आता होती गेली कुठे अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. सध्या सातत्याने अचानक रात्री वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी लाखो रुपयांचा “प्री-मान्सून मेंटेनन्स” केल्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात कामे फक्त कागदावरच होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे.
शहर व ग्रामीण भागात परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, आकाशात ढग दाटले किंवा हलकासा वारा वाहू लागला तरी वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. ग्रामीण भागातील शेतीपंप वारंवार बंद पडत असल्याने शेतीवर मोठा परिणाम होत आहे.
दरवर्षी मेंटेनन्सच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असल्याचे दाखवले जाते. मात्र शहरात आणि गावागावांत आजही: अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीप्रमाणे शेतातला डीपी जळाला की शेतकरी पैसे देऊन डीपी आणून बसवत असल्याने या डीपीचे पैसे जातात कुठे असा सवाल होत आहे याचबरोबर ग्रामीण भागात फ्युज बदलणे वायरिंग जोडणे याचाही खर्च शेतकऱ्यांना गरज असल्याने स्वतःच करतात मग हे साहित्य कुठे जाते असाही सवाल केला जात आहे वीज तारा झुकलेल्या अवस्थेत,वाकलेले पोल,झाडांच्या वेलींचा विळखा,उघडे डीपी बॉक्स,आडवे होत असलेले खांब,धोका दायक स्थितीत.
तुळजापूर शहरासह तालुक्यात महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र नाराजी
कागदी मेंटेनन्स थांबवून प्रत्यक्ष कामे करावीत,” ग्राहकांची मागणी!








