Best News Portal Development Company In India

नृत्यशैली भरतनाट्यम् नृत्यालय करमाळा आयोजित नृत्यसंध्या आणि विद्यार्थी गुणगौरव नुकताच उत्साहात संपन्न; श्री. अविनाश जोशी

नृत्यशैली भरतनाट्यम् नृत्यालय करमाळा आयोजित नृत्य संध्या आणि विद्यार्थीनी गुणगौरव नुकताच उत्साहात संपन्न
अविनाश जोशी/करमाळा
करमाळ्यात शास्त्रीय नृत्य क्लासची सुरुवात भरतनाट्यम् शिक्षिका मितवा श्रीवास्तव अग्रवाल यांनी मयूरीताई जोशी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांपूर्वी सुरू केली.
सूज्ञ पालक आणि विद्यार्थ्यांनींच्या सहकार्याने आज हे छोटंसं रोपटं वाढीस लागलेले आहे.
कालच केमिस्ट भवनला भरतनाट्यम् नृत्य आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा मा.बीडीओ मनोज राऊत व डॉ.अपर्णा भोसले, डॉ सत्यपाल श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली.
पहिली आणि दुसरी भरतनाट्यम् ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनींना प्रमाणपत्र वितरण व सहभागी विद्यार्थ्यांना कौतुकपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
सदर कार्यक्रमावेळी मा.मनोज राऊत यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी व पालक वर्गाला सखोल मार्गदर्शन केले.
कलेमुळे माणूस डिप्रेशन मध्ये जात नाही.अपयश पचवायची एक ताकद त्याला मिळते.तसेच अभ्यासा व्यतिरिक्त अवांतर वाचनावर भर द्यायला हवा असे मत मा.मनोज राऊत यांनी मांडले.
मा. डॉ अपर्णा भोसले म्हणाल्या की भरतनाट्यम् हा नृत्यप्रकार सादर करणे म्हणजे ही एक मोठी अभिजात अशी कला आहे.
सर्वांगीण विकास करण्यासाठी शास्त्रीय नृत्य साधना आवश्यक आहे.
प्रास्ताविकात मितवा श्रीवास्तव अग्रवाल म्हणाल्या की ही एक गुरु शिष्य परंपरा आहे.नियम आणि बंधनात राहून नृत्य करणे सोपे नाही.कलेमुळे माणूस एकटा रहात नाही.साधाही रहात नाही तर तो एका विशिष्ट अशा उंचीवर पोहचतो.
पालक मा.वालचंद माने यांनी मितवा श्रीवास्तव यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.ते म्हणाले की मितवा ताई सारखे मेहनती गुरु मुळे आज आमच्या विद्यार्थ्यांनी छान नृत्य करत आहेत.हा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळवून दिला त्याबद्दल आभार.
मा.जयश्रीवीर ,मा.अनुराधा शिगची यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जिजाऊ प्रशस्ती,अंगिकम्, नमस्कार, पुष्पांजली, लक्ष्मी स्तोत्र, गणेश वंदना इ.भरतनाट्यम् नृत्यातून विद्यार्थ्यांनींनी प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी सूज्ञ पालकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बक्षीसांची खरंच बरसात झाली.
सूत्रसंचलन मा.रेणुका दळवी यांनी आपल्या बहारदार शैलीतून सादर केले.
आभार संचालिका गझलकार मितवा अग्रवाल यांनी मानले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
अनेक मान्यवर महिला पालक विद्यार्थी यांनी आपली उपस्थिती दर्शवली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india