हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना परिसरात विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटिल यांच्या हस्ते व्रक्षावरोपण करण्यात आले.
उमरगा/लोहारा प्रतिनिधीआदिनाथ भालेराव.
हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत दि .८ रोजी
मुरूम येथील विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना परिसरात विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानात सहभागी होत” झाडे लावा ,झाडे जगवा” हा संदेश देऊन वृक्षारोपण केले.
यावेळी विभागीय वन अधिकारी मूल्यांकन संभाजीनगर श्रीमती खोपडे , वनपरिक्षेत्र अधिकारी उमरगा शिंगणकर, वन परिमंडळ अधिकारी उमरगा श्रीमती पारशेवाड, वनपरिम़डळ अधिकारी लोहारा श्री सूर्यकांत माळी , दांडगे ,चौगुले, सदानंदे, कोकाटे
वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश गवसाने , माजी नगराध्यक्ष रशीद शेख,कारखान्याचे अधिकारी, राखेलकर, देशमुख, गायकवाड, कस्तुरे, अष्टेकर अधिकारी व कर्मचारी, मान्यवर उपस्थित होते.








