उद्योजकांच्या समस्या आणि संघटन मजबुतीसाठी मुंबईत विशेष बैठक संपन्न
मुंबई:
नव्याने होणारी संघटनात्मक बांधणी आणि उद्योजकांसमोर उभे ठाकलेले विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी नुकतीच एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुंबई आणि ठाणे ग्रामीण परिसरातील संघटनेच्या विस्तारावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला मुंबई विभाग अध्यक्ष अश्विन हेमंतकुमार केळकर, मुंबई पश्चिम अध्यक्ष सुजित गुप्ता आणि मुंबई विभाग उपाध्यक्ष उदयराज राजू सिताराम तळेकर प्रामुख्याने उपस्थित होते. संघटनेची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे जाळे अधिक भक्कम करण्यासाठी यावेळी विविध नियोजनांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
बैठकीतील महत्त्वाचे चर्चेचे मुद्दे:
एनजीओ मार्फत नियोजन: सामाजिक कार्याचा भाग म्हणून एनजीओच्या माध्यमातून कशा प्रकारे काम करता येईल, यावर पांचाळ सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थी मार्गदर्शन: १०वी आणि १२वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअरसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याबाबत श्री. निलेश कर्वे सर यांनी योजना मांडली.
ठाणे ग्रामीण विस्तार: ठाणे ग्रामीण जिल्ह्यात संघटनेची नवीन मांडणी करून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी संदीप उबाळे यांनी आगामी योजनांची माहिती दिली.
मुंबई विभागाच्या वतीने संघटना अधिक कशी ‘बरकत’ (प्रगत) होईल आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींना सोबत घेऊन सर्वांगीण विकास कसा साधता येईल, यावर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. “येणाऱ्या काळात सर्व उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठी संघटना अधिक आक्रमकपणे कार्य करेल,” असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.






