Best News Portal Development Company In India

आपल्या सर्वांच्या विश्वासाच्या बळावर हा अविरत संघर्ष सुरू राहील – प्रा सुरेश बिराजदार

आपल्या सर्वांच्या विश्वासाच्या बळावर हा अविरत संघर्ष सुरू राहील
– प्रा सुरेश बिराजदार

आपल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी हा अविरत संघर्ष सुरू राहील – प्रा सुरेश बिराजदार

शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल देण्यासह कारखाना सुरू करण्यासाठी प्राधान्य ; वाढदिवस न करण्याचे आवाहन

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे सावट ,शेतात पीकाची शास्वती नाही .अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .शेतकरी अडचणीत आहे .त्यात भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याचे थकीत ऊस बिलामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत .अशा परिस्थितीत दि.२० ऑगस्ट रोजीचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुरेशदाजी बिराजदार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात जाहीर केले आहे .
देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात , आपल्या भागात शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती देणार पीक म्हणजे ऊस आणि रक्त आटवून स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या ऊसाला कित्तेक वर्ष बांधावर तोडून टाकताना शेतकऱ्यांच्या वेदना मी पाहिल्या आहेत . अशा परिस्थितीत भाऊसाहेब बिराजदार कारखाना उभारण्याचं स्वप्न उराशी बाळगून 20 ते 25 वर्ष सतत संघर्ष करत कारखाना उभा केला .कित्येक अडचणींना तोंड देत शासन दरबारी खेटे घालत . एक रकमी भाग भांडवल मिळण्याचे धोरण असताना पंधरा वर्ष विभागून मिळालेल्या भाग भांडवलावर कारखाना उभा केला .वेळप्रसंगी आमच्यासह संचालक मंडळाचे घरातील सोनं नान शेतीबाडी गहाण ठेवून कारखाना चालू केला . पण कधी सलग चार वर्ष पडणारा दुष्काळ तर कधी साखरेचे पडलेलेभाव कारखाना अडचणीत आणण्यासाठी कारणीभूत ठरले आणि कारखाना अडचतीत आला . एक वेळ इतरांसारख रिकामी भाषणे करत ,स्वतःसाठी ही जगता आलं असतं . शेतकऱ्यांच्या ऊसावर होणार राजकारण पाहुण वेदना व्हायच्या पण अशाही परिस्थितीत भाऊसाहेबांच स्वप्न , आमच्यावर झालेले संस्कार आम्हाला आपल्या लोकांसाठी ,आपल्या शेतकऱ्यांसाठी ,आपल्या भागासाठी स्वस्थ बसू देत नव्हते . कारखाना चालवायला अनेक जण इच्छुक होते पण आम्ही हा कारखाना परत जिद्दीने आदरणीय अजितदादा पवार यांच्यासारख्या सक्षम हातात दिला .दादांनीही पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर कारखान्यात अनेक प्रकल्प उभारत कारखाना मोठा केला .आज पर्यंत आठराशे , एकोनवीसशे पर्यंत शेतकऱ्यांना ऊसाचा दर मिळणाऱ्या भागात आठ्ठावीसशे रुपयांपर्यंत भाव मिळू लागला तोही वेळेत . क्युनर्जी इंडस्ट्रीज च्या माध्यमातून सात वर्ष कारखान्याने उत्तम गाळाप करत आपल्यासह आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती कडे नेलं .उमरगा लोहारा तालुक्यासह शेजारील निलंगा ,औसा ,तुळजापूर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही भाऊसाहेब कारखान्याने सर्वाधिक भाव दिल्याने इतर कारखान्यांनाही जास्तीचा भाव द्यावा लागत असुन इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळू लागला .ऊसाला चांगला भाव दिला .वेळेवर हप्ता दिला . तोडणी वाहतूकदारांना चांगला व्यवसाय दिला .परिसरातील युवकांना , कर्मचाऱ्यांना हाताला काम दिले .अनेक आजूबाजूच्या व्यावसायिकांना आधार दिला . कारखान्याचे नावलौकिक झालं . लोक कौतुक करताना थांबत नव्हते अशी परिस्थिती निर्माण झाली होती .
पण काळाच्या मनात वेगळंच होतं ज्यांच्या परिसस्पर्शाने हा कारखाना सोन्याचा धूर काढत होता .त्या अजित दादांचं अकाली निधन झालं .केवळ कारखाना अडचणीत आला नाही तर आमची त : हयात केलेली सेवा ,संघर्ष ,घेतलेले परिश्रम ,कवडीमोल झाले .आम्ही राजकारणात तर पोरके झालोच शिवाय अनेक वर्षांच्या संघर्षानंतर उभारलेल्या भाऊसाहेब बिराजदार कारखानाही परत काही काळासाठी अडचनीत आला आहे .अपरिहार्य कारणामुळे शेतकऱ्यांचे व तोडणी वाहतूकदारांचे ऊस बिल देण्यासाठी बराच विलंब झाला आहे .
आमचे दैवत स्व: अजितदादा यांचे दुःखद निधन होऊन आजून १ वर्षही पूर्ण झालेला नाही . माझ्या भागातील शेतकऱ्यांनी दादाचा शब्द प्रमान मानून आपल्या भाऊसाहेब सहकारी साखर कारखान्याला ऊस दिला होता .त्या माझ्या शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल काही अपरिहार्य तांत्रिक कारणामुळे आजून मिळाले नाही . त्याचा पाठपुरवा आम्ही आमच्या स्तरावर पुर्णपणेकरतच आहोत . निश्चित ऊस बिल देण्यासाठी उशीर झाला आहे . पण येत्या काही दिवसात संपूर्ण बिल मिळवून दिल्याशिवाय आणि कारखाना चालू केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही . त्यातच यावर्षी पुन्हा एकदा आपल्या भागात पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाचे गंभीर सावट निर्माण झाले आहे. शेतात पीक नाही, जनावरांना चारा नाही आणि माणसाच्या डोळ्यात पाणी आहे. गावोगावी पिण्याच्या पाणीची सुद्धा दयनीय अवस्था निर्माण झाली आहे . अशा परिस्थितीत गुलाल, फटाके आणि हारतुरे घेऊन माझा वाढदिवस साजरा करणे माझ्या मनाला पटत नाही. आमच्यावरील आपुलकी व प्रेमापोटी प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करणार असल्याचे समजते म्हणून मी संकल्प केला आहे की, यंदा माझा दि २० ऑगस्ट हा वाढदिवस ना बॅनर, ना गुच्छ, ना फटाके , ना हार तुरे कोणत्याही प्रकारे साजरा करू नये. भाऊसाहेब बिराजदार कारखाना अनेकांच्या चुलीचा आधार तर शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग आहे . या अर्थवाहीनीला सुरू करणे परत उभा करणे अत्याआवश्यक आहे .शेतकरी सभासद यांच्यासह आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .शेतकऱ्यांचे हाल आम्हालाही माहित आहेत .नोव्हेंबर ,डिसेंबर व 15 जानेवारीपर्यंतचे वेळेवर संपूर्ण ऊस बिल देण्यात आले आहे .यापुढील उस बिल देण्याची प्रक्रिया सुरू असून आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत .अनेक शेतकरी मागील अनेक दिवसापासून संविधानिक मार्गाने कारखान्याच्या समोर ऊन पावसात उपाशी तापाशी आंदोलन करीत आहेत .तो त्यांचा हक्क आहेच आम्हीही त्यांच्यासोबत आहोत .पण काही अपप्रवृत्ती जाणीवपूर्वक याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत .चुकीच्या मार्गाने आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेला बाधा आनून प्रश्न सुटणार नाहीत .त्यासाठी योग्य संविधानिक मार्गानेच चर्चा करुण आपल्या मागण्या मान्य करूण घेता येतात .या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपणा सर्वांच योगदान ,पाठिंबा , आशीर्वाद आम्हाला निश्चित प्रेरणा आणि बळ देत राहील .सर्वांनी थोडासा संयम बाळगावा . भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचे थकीत ऊस बिल दिल्याशिवाय व हा कारखाना परत त्याच सन्मानाने सुरू केल्याशिवाय मी स्वस्थ बसनार नाही .आपला माझ्यावरील विश्वास , प्रेम , पाठींबा याच माझ्यासाठी शुभेच्छा .या संकटातून परत उभे राहण्यासाठी आपल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी हा अविरत संघर्ष सुरू राहील .
असे पत्रकारांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुरेशदाजी बिराजदार यांनी म्हंटले आहे .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india