अ-ब-क-ड वर्गीकरणासाठी धाराशिवमध्ये मातंग समाजाचा जनक्षोभ; भव्य महामोर्चाने राज्य सरकारचे वेधले लक्ष!
तुळजापूर प्रतिनिधी :-
मातंग समाजाच्या दीर्घकालीन ‘अ, ब, क, ड’ आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी धाराशिव शहरात मातंग समाजाचा अभूतपूर्व आणि विराट महामोर्चा पार पडला. लहुजी शक्ती सेनेच्या भव्य कमानीखाली सकल मातंग समाज आणि मातंग बांधवांनी एकत्र येत आपल्या हक्कांसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
या ऐतिहासिक महामोर्चामध्ये समाजातील आजी-माजी आमदारांसह विविध क्षेत्रांतील वरिष्ठ नेतेमंडळी, महिला, बालके आणि वृद्धांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या मातंग बांधवांनी आणि युवा कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या वज्रमूठीमुळे संपूर्ण धाराशिव शहर मातंगमय झाले होते.
सकल मातंग समाज, महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक आणि मातंग समाजाचा बुलंद आवाज मानले जाणारे सन्माननीय युवराज (नाना) शिंदे यांच्या चाणक्य नीती आणि कुशल देखरेखीखाली हा संपूर्ण महामोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गाने पार पडला.
मोर्चातील प्रमुख वैशिष्ट्ये:
भव्य उपस्थिती: आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने मातंग बांधव व युवा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
एकजूट व वज्रमूठ: मातंग समाजातील सर्वपक्षीय नेते, युवा कार्यकर्ते आणि महिलांची अभूतपूर्व एकता पाहायला मिळाली.
शांततेत पडला पार: हजारो लोकांची गर्दी असूनही युवराज (नाना) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शांततेत व शिस्तीत हा मोर्चा संपन्न झाला.
या महामोर्चाच्या माध्यमातून मातंग समाजाने आपल्या रास्त मागण्यांसाठी प्रशासनाला आणि राज्य सरकारला स्पष्ट व ठाम इशारा दिला आहे.
आमदार: मा. आमदार अमित गोरखे (पुणे), मा. आमदार सुनील कांबळे (पुणे), मा. आमदार सुधारक भालेराव (उदगीर)
समिती प्रतिनिधी व प्रमुख नेते: मा. मंत्री लक्ष्मणराव ढोबळे (मंगळवेढा), विष्णुभाऊ कसबे (संस्थापक अध्यक्ष, लहुजी शक्तीसेना), डॉ. अंकुश गोतावळे, डॉ. प्रा. रामचंद्र भरांडे (लोकस्वराज्य आंदोलन), मारूती वाडेकर (सकल मातंग समाज राज्य समन्वयक), प्रा. भगवानराव वाघमारे, पंडित सूर्यवंशी, संजय शेजुळ, नगरसेवक विलास लोंढे, माजी नगरसेवक दत्ता पेठे, प्रा. जोशीलाताई लोमटे, प्रभाकर लोंढे, नगरसेवक दीपक रोडगे (लोहारा), भास्कर किसन शिंदे (लहुजी विद्रोह सेना संस्थापक) यांसह धाराशिव जिल्ह्यातील व राज्यातील ५० हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
मागण्या मान्य न झाल्यास मोर्चे, निदर्शने आणि धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही कृती समितीने दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीताने विराट मोर्चाची सांगता.








